शिक्षकांचे पाठ टाचण काढण्याबाबत शिक्षण विभागाकडून सुरुवातीला शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट निर्देश देत पाठ टाचण काढू नये, असे पत्र जारी केले होते.
त्या पत्रामध्ये वर्गातील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षमतेचे असतात, त्यामुळे ठराविक चौकटीत किंवा एकसारख्या पद्धतीने अध्यापन करणे शक्य नसते, असा महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला होता.
प्रत्येक वर्गात अल्पगती, सरासरी व प्रगत स्तरातील विद्यार्थी असतात. अशा परिस्थितीत एकाच मोजपट्टीने शिक्षकांच्या अध्यापनाचे मूल्यमापन केल्यास ते अन्यायकारक ठरू शकते, अशी भूमिका त्या पत्रात स्पष्ट करण्यात आली होती.
शिक्षकांना परिस्थितीनुसार, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धती बदलण्याचे स्वातंत्र्य असावे, असेही नमूद करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर शिक्षण विभागाकडून पाठ टाचण काढणे व त्याची नोंद लेखनाबाबत नव्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार पाठ निरीक्षण करताना केवळ त्रुटी शोधण्याऐवजी मार्गदर्शन, सुधारणा व अध्यापन गुणवत्ता वाढवणे हा उद्देश ठेवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निरीक्षण SQAAF, NCF तसेच NEP 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असावे