स्वदेशीचा नारा भारत देश हमारा
👇टच here भारतीय वस्तू 👇
https://youtu.be/nglJmdiAMHA?si=UojHyaCYsy7ZTx2e
संदेश 👇👇👇
https://youtu.be/QrpIr4seSzs?si=y_JrNXdFSDBiEIAA
भारत आता जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे असं मोदींनी म्हटलंय. देशवासियांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा आणि आता वेळ आलीय की प्रत्येक भारतीयाने कोणतीही गोष्ट खरेदी करताना देशहिताला प्राधान्य द्यायला हवं असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं की, भारत आता प्रत्येक गोष्ट पारखून घेण्यासाठी एकच तराजू वापरेल आणि ते म्हणजे भारतीयांच्या घामाने बनलेल्या वस्तू. आता वेळ आलीय की प्रत्येक नागरिक, प्रत्येक दुकानदार आणि ग्राहकाने हा मंत्र स्वीकारला पाहिजे की तीच वस्तू खरेदी करू जी भारतात तयार झालीय. भारतीय हातांनी बनवलेली आणि भारतीयांच्या घामाने तयार झालेली वस्तू घ्या. जागतिक अस्थिरता निर्माण झाली असताना देशाला तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने नेणं हे फक्त सरकारचंच नाही तर प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.
आज जगातील अनेक अर्थव्यवस्थांवर अस्थिरतेची टांगती तलवार आहे. अस्थिरतेची स्थिती आहे. अशा स्थितीत देश आपआपल्या हितांवर लक्ष केंद्रीत करत आहे. भारतसुद्धा तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. यासाठी भारतालाही आपल्या आर्थिक हितांबाबत सतर्क रहायला हवं. शेतकरी, लघु उद्योग, युवा, रोजगार यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायला हवं असंही मोदी म्हणाले.
भारताने कोणती वस्तू खरेदी करायची यासाठी एकच तराजू असेल आणि तो तराजू म्हणजे भारतीयाच्या घामाने जी वस्तू तयार झालीय ती खरेदी करायची. भारतात बनलेल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं. हेच आपल्यासाठी स्वदेशी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. स्वदेशीची ही भूमिका आपलं भविष्य ठरवणार आहे. तसंच ही महात्मा गांधींना श्रद्धांजली ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील व्यापारी आणि उद्योगविश्वाला विनंती केली की आता वेळ आलीय की फक्त स्वदेशी उत्पादनांची विक्री करायची. व्यापाऱ्यांना विनंती आहे की आपल्या दुकानात फक्त स्वदेशी साहित्यच विकायला ठेवा हीच खरी देशसेवा असेल. घरात नवं साहित्य येईल ते स्वदेशी असावं याला प्राधान्य दिलं पाहिजे.



















































