इयत्ता
५ वी :: विषयः परिसर अभ्यास १
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) वस्तूच्या (पृथ्वीच्या )स्वतःभोवतीच्या फिरण्याला ________ म्हणतात.
२)____________मुळे पृथ्वीवर उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध तयार झाले आहे.
३) पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत_________भोवती परिभ्रमण करत असते.
४) २३ सप्टेंबर ते २२ मार्च या काळात_____ गोलार्धात दिनमान जास्त असतो. (अ.नि.क्र
४) पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा__________ भाग दिसतो. (अ.नि.क्र.५११)
५)अमावास्ये पासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवड्याला________ म्हणतात. (अ.नि.क्र.५११)
६) पृथ्वीच्या परिवलनामुळे_____व ______होते
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशीत भाग कमी कमी होत जातो त्यास काय म्हणतात ?
उत्तरः
२) पृथ्वीवर ऋतू चक्र कशामुळे निर्माण होतात ? (अ.नि.क्र.५११)
उत्तरः
३) पृथ्वीच्या एका परिवलनाच्या कालावधीस आपण काय म्हणतो ? (अ.नि.क्र.५११)
उत्तरः
४) पृथ्वीच्या दोन ध्रुवांची नावे लिहा. (अ.नि.क्र.५११)
उत्तर:
५) भारतात प्रामुख्याने कोणकोणते ऋतू आहेत ? (अ.वि.क्र.५११)
उत्तरः
६) चांद्रमास म्हणजे काय ? (अ.नि.क्र.५११)
उत्तरः
