*शिक्षण क्षेत्रातील समृद्ध पिढी सोडून जातेय....*
*आज 31 मे नियत वयोमानानुसार शिक्षण क्षेत्रातील अनेक जण सेवानिवृत्त होत आहेत. खरंतर या क्षेत्राला सर्वोच्च शिखरावर पोहोचवणारी ही पिढी आज आपला निरोप घेते आहे*
*कुटुंबाची गरज म्हणून डी. एड. केले. कारण, नोकरीची शंभर टक्के गॅरंटी होती आणि नोकरीही मिळाली. गावापासून दूरवरच्या दऱ्याखोऱ्यात, डोंगर वस्तीत पसरलेल्या गावात नोकरीची अनेकांची सुरुवात झाली. काहींची परतालुक्यात नोकरी सुरू झाली. प्रवासाची आजच्या एवढी सुविधा नव्हती. धड एसटीचीही सोय नव्हती मग अशावेळी मलौनमैल पायपीट करायची नाहीतर सायकलने जायचं. काहीना तर शाळेत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मग गुरुजींचा मुक्काम शाळेतच पडायचा. बदलीच्या वेळी वळकट बांधून तयारच आहे असे गमतीने म्हटलं जायचं आठवड्यातून एकदा गावी येणे जाणे असायचे.*
*पायात पॅरागॉन स्लीपर, साधासुधा पेहराव, काखेत शबनम बॅग नाहीतर पिशवी.अशा वेषात शिक्षक शाळेत जायचे. गुरुजींना बघून पोरांचाही आनंद गगनात मावेनासा व्हायचा. गुरुजी आलेsssss गुरुजी आलेsssss म्हणून एकच गलका व्हायचा. आपल्या गुरुजींची वाट पाहण्यासाठी पोर शाळेच्या बाहेर येऊन थांबलेली असायची.*
*दिवसभर गुरुजींचे शिकवणं व्हायचं. गाणी, गोष्टी, खेळ यात गुरुजी आणि मुलं तल्लीन व्हायची.काही गुरुजींची वळकटच शाळेतच असायची. स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेण्यात गुरुजी मग्न असायचा. अशाही काही शाळा असायच्या*
*आजच्यासारखं ताण-तणाव निर्माण करणाऱं सोशल मीडिया युग नव्हतं. त्यामुळे दिवसभर गुरुजी पोरांच्यात तल्लीन होऊन जायचे आणि शिक्षणाचा आनंद लुटायचे. त्या काळातले वनभोजन, गॅदरिंग, सहल, क्रीडा स्पर्धा त्यात गुरुजी आणि पोरं बेभान होऊन राबायचे.*
*प्रशिक्षणही निवासी असायचे उदा. स्मार्ट पिटी, पहाटे पाच वाजता उठायचे मग सहा वाजता योगा, दिवसभर प्रशिक्षण, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही अद्भुत असायचे*
*अशैक्षणिक कामाचा कुठलाही ताण तणाव नव्हता. महिन्यातून एकदाच मासिक पत्रक दिले की काम होऊन जायचं. ऑफिसचा एखादा निरोप असला तर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत तो निरोप पोचवायला पोरं जायची. निरोप कागदावर लिहिलेला असायचा. एवढ्यावरच काम होऊन जायचं.*
*विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी शाळेला भेटी द्यायचे. साहेब येणार म्हणल्यावर गुरुजींना भीती वाटायची. वार्षिक तपासण्या वेळेवर व्हायच्या, त्याची जोरदार तयारी असायची.*
*पूर्वी पोट तालुक्याचे गटसंमेलन असायचे. पायपीट करून लोक शाळेत जायची. आलेल्या गुरुजींचं पाय धुण्यापासून स्वागत व्हायचं. शाळेत सडा सारवण घातलं जायचं. रांगोळ्या घालायच्या. शाळेत ईशस्तवन, स्वागत गीताचे सुमधुर, संगीतमय सुर कानावर पडायचे.इतरही कार्यक्रमाची जोरदार तयार केलेली असायची. खाण्यापिण्याची रेलचेल असायची. दुसऱ्या शाळेपेक्षा आपल्या शाळेचे गट संमेलन यशस्वी होण्यासाठी सगळेजण राबायचे.*
*संघटनांची अधिवेशने म्हणजे गुरुजींना कुटुंबासह फिरण्याची जणू पर्वणीच असायची. लोक अधिवेशनाची वाटच बघायचे मित्रमंडळी, कुटुंबासह फिरण्याची सर्वजण मजा लुटायचे.*
*बऱ्याच गुरुजींचा मुक्काम शाळेतच असायचा. काही वेळेला परिसरातील गुरुजी एकत्र येऊन मुक्काम करायचे. मग काय धमाल मस्ती असायची. यातून एकमेकांच्या सुखदुःखाची चर्चा व्हायची आणि रात्र कधी गेली हे कुणालाच कळायचं नाही.*
*गुरुजींचा संपूर्ण वेळ आपल्या विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त करण्यातच जायचा. पालकांचाही गुरुजींच्यावर प्रचंड विश्वास होता. गुरुजींच्या घरगुती कार्यक्रमात अख्ख गाव सामील व्हायचं. खरंतर हे सगळं या पिढीने अनुभवलं. समृद्ध अनुभव घेतलं. अशी ही शिक्षकांची पिढी आता सेवानिवृत्त होत आहे त्यांच्यासोबतच्या या सोनेरी आठवणींसोबतच आपण यांना निरोप देत आहोत.*
Copy पेस्ट
संकलन
📙📘📗📕📚📙📘📗📕
*प्रशांत प्रल्हाद पेंधे*
शैक्षणिक क्रांती 200ग्रुप
https://chat.whatsapp.com/H5Qed7vCLhg8Yfb5PRHuWv
*✍️वापर करा..*
*✍️जतन करा..*
*✍️इतरांनाही पाठवा..*
