*शुद्ध नाही तुझी भावना...*
*देव कोठे आहे सांग ना...*
*देव कोठे आहे तर मानवाच्या अंतरी*
*आमच्या चिमुकल्यांच्या अंतरी*
*🚩🚩अखंड महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी गोष्ट म्हणजे वारी..!!🚩🚩*
या वारी मध्ये अनेक वारकरी शिस्तबद्ध पणे पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला जात असतात ,वाटे मध्ये नाचून ,अभंग गाऊन आयुष्यातील सर्व दुःख कष्ट विसरून परमेश्वराचे स्मरण करतात..
हा एक मोठा सोहळाच असतो याची अनुभूती देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा धुपरवाडी येथे दिनांक ५/०७/२०२५ रोजी विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. तसेच या बरोबर नव भारत साक्षरता अभियान विषयी देखील संदेश देण्यात आला.
*सदर उपक्रमात सर्व विद्यार्थी , शिक्षिका व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले...*

