सोमवार, २३ मार्च, २०२६

नवोदय

 *🙏 सर्वांना नमस्कार🙏*

👉 ही पोस्ट मी आता करण्याचे एकच कारण आहे की नवोदयचा निकाल लागल्यास खूप पालक हे खूप टेन्शनमध्ये दिसले. खूप पालकांना त्यांचा मुलगा / मुलगी नवोदय ला पात्र झाला नाही याचे दुःख आहे .या दुःखापेक्षा  जास्त दुःख म्हणजे त्यांच्या मुलांना खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत काही काही मुलांना तर 100 पैकी 97.50 तसेच 96.25 तसेच 90 पेक्षा जास्त एवढे गुण पडून जरी आपला मुलगा /मुलगी लागत नसेल तर खरंच या पालकांना टेन्शन येण्याचे कारण आहेच ; परंतु आपणच असं विचार करत बसलो तर त्या मुलांच्या मनाचा विचार कोण करणार. त्या मुलांना काय वाटत असेल. त्यांनी त्यांचे शंभर टक्के योगदान, प्रयत्न दिलेले आहेत. पालकांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला जितके दुःख वाटत आहे त्याच्यापेक्षा जास्त दुख त्या मुलांची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांना वाटत आहे; आम्हा शिक्षकांना या मुलांवर खूप विश्वास होता कारण या मुलांचा सराव या मुलांचा प्रयत्न या मुलांची सातत्याने अभ्यास करण्याची सवय आम्ही खूप जवळून पाहिलेले आहे. एवढ्या जवळ जाऊन जर मुलं नवोदय ला पात्र होत नसतील तर खरंच खूप दुःख वाटतं. यावर्षीचा पेपर अतिसोपा आल्यामुळे मित्रांनो Merit खूप हाय गेले आहे. त्यातच अजून एक गोष्ट झालेली आहे आपली मुले हे सातत्याने अभ्यास करत होते .आपण सोपे, माध्यम व कठीण प्रत्येक प्रकारच्या प्रश्न प्रकारचा खूप सराव केलेला आहे. पेपर हा खूपच सोपा असल्यामुळे आपले मुलं थोडे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये सुद्धा गेलेले आहेत हे पण सत्य आहे.त्यामुळे  तुम्ही पहा मुलांचे चुकलेले प्रश्न हे खूप सोपे सोपे आहेत हे तुम्हाला सुद्धा जाणवेल. याचे एकच कारण आहे मित्रांनो की आपल्या मुलांना ती परिस्थिती हाताळता आलेली नाही. सोपा पेपर आल्यास आपण स्थिर राहिला पाहिजे यावर त्यांचा थोडा कंट्रोल राहिला नाही. सोप्या प्रश्नाला ते अती सोपा समजले आणि पेपर सोडवीत गेले. याचे  असं झालं की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांना झटकी पट भेटायला लागलं आणि तेच बरोबर आहे असा विचार करत ते पेपर सोडवून गेले. गणित विषयात तर मेरिट लावणारा एकही प्रश्न  न्हवता.त्यामुळे पेपर  सोडवून आल्यावर बाहेर आल्यावर  सुद्धा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सांगत होता की त्यांना सगळा पेपर सोपा गेलेला आहे ;परंतु तसे नव्हते .काही सोपे सोपे प्रश्न त्यांनी नजर अंदाज करण्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मुळे चुकलेले आहेत. घरी आल्यावर पेपर तपासताना त्यांच्या ते लक्षात आले.आता निकाल लागला आहे. काही विद्यार्थी नवोदयला पात्र झाले. काही विद्यार्थी झाले नाहीत. झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन ; परंतु जे मुलं नवोदयला पात्र झाले नाहीत त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी हे लक्षात ठेवायला हवे की आपला मुलगा हा स्कॉलर आहे. अहो कोणत्याही परीक्षांमध्ये 90 पेक्षा जास्त टक्के घेणं नॉट अ जोक .हे साधे काम नाहीये .त्यासाठी खूप मेहनत लागते. प्रयत्न लागतात .सातत्य लागते आणि ते तुमच्या मुलांमध्ये यावर्षी दिसून आले. तुम्ही पालकांनी लक्ष दिले का ?नाही. मला माहित नाही पण माझ्या लक्षात आले की तुमच्या मुलाचा या नवोदय परीक्षेमुळे व स्कॉलरशिप परीक्षेमुळे आयुष्यभराचा गणिताचा /मराठी/ बुद्धिमत्ता/ इंग्रजी या विषयांचा पाया 100% मजबूत झालेला आहे . तुमचा मुलगा / मुलगी आता कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे जाऊ द्या तो / ती स्पर्धा परीक्षेमध्ये  कधीच मागे पडणार नाही. तो / ती कोणत्याही स्पर्धा परीक्षेला पुढे बसू द्या. ते आता यशस्वी होणारच. त्यांना स्पर्धा परीक्षेचा अर्थ कळलेला आहे .स्पर्धा परीक्षांमध्ये जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही हे त्याला कळलेलं आहे. यशाच्या जवळ जाऊन त्यांनी अपयश पाहिलेले आहे. आता फक्त त्यांना आपण ते अपयश पचवायला शिकविले पाहिजे. या वयात जर आपल्या विद्यार्थ्यांनी ते अपयश पचविले तर मित्रांनो आपला विद्यार्थी पुढे कधीच खचणार नाही कारण त्याला ती जाणीव आहे की अपयश आल्यास ते कसे पचवायचे. सर्व पालकांना एकच विनंती आहे झालेल्या गोष्टीचा विचार करू नका .पुढे प्रत्येक इयत्ता मध्ये स्पर्धा परीक्षा आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला मुलांना बसवा यश - अपयश हे तर आपल्याला ठरलेले आहे .यश आले तर आनंद माना .अपयश आले तर मित्रांनो मुलांना तुम्हाला एक नवीन अनुभव आला असे समजून पुढे सरकत चला. आपले खरे टार्गेट हे  IAS, IPS  तसेच उच्च पदावर पोहोचणे त्यापेक्षा महत्त्वाचे भारताचा उत्तम संस्कारिक नागरिक होणे हे आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्या ध्येयाकडे जाताना खाचखळगे ,संघर्ष ,अपयश  या गोष्टी असणारच आहेत. ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातील मित्रांनो या पायऱ्या आहेत. 

🙏🙏 परत एकदा सर्व पालकांना - विद्यार्थ्यांना तुम्ही वर्ष दोन वर्ष केलेल्या मेहनतीसाठी खूप खूप अभिनंदन. तुम्ही कोणीही अपयशी झालेले नाहीत तुम्ही खूप काही या स्पर्धा परीक्षेतून मिळविलेले आहे. हे तुम्हाला आज नाही कळणार पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला हे नक्की दिसून येईल. ॲक्शन आणि रिएक्शन ह्या दोन गोष्टी जशा मित्रांनो एकमेकाला पूरक आहेत .त्याप्रमाणे तुम्ही केलेली कृती हे तुम्हाला पुन्हा दिसून येईल फक्त मित्रांनो प्रयत्न करायचे थांबवू नका. 

कोणतीही एक परीक्षा तुमच्या मुलाचे भवितव्य ठरवू शकत नाही हे कायम लक्षात ठेवा.

🙏 पालकांनो आता मुलांना मोटिवेट करा .त्यांना त्यांनी  मिळविलेले गुण हे खूप आहेत असे समजून त्यांचे स्वागत करा. ह्या लहान वयामध्ये त्यांना असे सांगू नका की बाळा तुला खूप कमी गुण पडले आहेत .अहो !एवढे गुण पडणे साधी गोष्ट नाही.खरंच मुलांनी खूप अभ्यास केलेला आहे. 

*🙏🙏 परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे तसेच वर्षभर मेहनत घेणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू - भगिनीचे स्पर्धा परीक्षेत केलेल्या मेहनतीसाठी /प्रयत्नांसाठी  खूप खूप अभिनंदन.💐💐*

*📚 Target 🎯 success*

*संपर्क - 9673655213*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...