१.२ आहार
प्र 1 ला थोडक्यात उत्तरे द्या
१)आहारात कशाचा समावेश असतो?
सर्वसाधारणपणे आपल्या आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार, खनिजे आणि पाणी यांचा समावेश असतो. यांमुळे आपला आहार समतोल होतो.
२)माझे जेवण कोणकोणते पदार्थ येतात?
पदार्थ : भात, आमटी, भाकरी, मासे,, अंडी, पालेभाज्या, कडधान्य, दूध,चिप्स,गोड पदार्थ
३)शरीराची वाढ व विकास कशामुळे होतो?
निरोगी व सुदृढ शरीरासाठी सुयोग्य चौरस आहार महत्त्वाचा ठरतो. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे हे आहाराचे मुख्य घटक आहेत. यातून शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. यासोबतच क्षारांचाही समावेश आहारात असावा त्यामुळे शरीराची वाढ व विकास होतो.
📓📙📕📘🏆📓📙📕📘💐📲👩💻📚👩💻📚
आजी, आजोबा, आई, बाबा, दादा, ताई जेवत आहेत. त्यांच्यात पुढील संवाद होत आहेत.
आजोबा : वा ! आज आमटी किती चवदार झाली आहे !
आजी : सर्व डाळींचं मिश्रण करून आमटी केली आहे.
बाबा : म्हणूनच ती इतकी चविष्ट लागते का?
दादा : नुसतीच चविष्ट नाही, तर तिच्यात शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, कर्बोदके, प्रथिनेसुद्धा आहेत.
आई : तुला रे कसं माहीत ?
ताई : अगं आई, आम्हाला हे शाळेत शिकवतात ना! यालाच समतोल आहार असे म्हणतात.
