🏆अनुभव लेखन🏆
१) तुला कुणाजवळ आपली चूक कबूल करावीशी वाटते? का? चूक झाल्यावर तू दुरुस्त कशी करशील? सविस्तर लिही.
२)शिक्षकांनी तुला फळ्यावर दिवाळीच्या सर्व शाळेसाठी शुभेच्छा लिहायला सांगितल्या आहेत. तुझ्या भाषेत तू त्या लिहा.
[इथं फक्त शुभ दीपावली' एवढंच अपेक्षित नाही. मुलांनी किमान चार ते पाच ओळीत आपल्या भावना लिहिणे अपेक्षित आहे.]
३) आई जेव्हा खूपच चिडते तेव्हा काय करते? ती शांत कशी होते? तुझा अनुभव लिही.
४) पाचवीच्या वर्गात तुझा पहिला दिवस कसा होता? तुझा अनुभव लिही.
५) खरं बोलण्याच्या फायदे आणि तोट्यांची यादी कर. प्रत्येकी तीन मुद्दे लिही.
६) शाळेतील मित्रांबरोबर/मैत्रिणींबरोबर बोलताना-खेळताना जेवताना गमतीजमती होत असतात. तूही अशा गमती जमती पहिल्या असशील. अशीच एखादी धम्माल गंमत लिहून काढ
७) तुझा दिनक्रम कसा आहे ते लिही.
८) शिक्षकांना कधी राग येतो? पाच गोष्टींची यादी कर.
९) तू कधीच करणार नाहीस अशा पाच गोष्टींची यादी कर.
१०) दिलेल्या विषयावर थोडक्यात अनुभव लिही.
a) आली थंडी
b) कडक उन्हाळा
c) पोहण्याची मजा
मुलांच्या दैनंदिन जीवनातील विषय निवडून त्यांना लेखनासाठी द्यावा.
११) एखद्या वस्तूचे भिन्न भिन्न उपयोग लिही
🥇काल्पनेवर आधारित लेखन🥇
१) तुझ्या बाबांनी कधी स्वैपाक केला तर त्या दिवशी काय काय घडेल ते थोडक्यात लिही.
२) दोन डायनासोरस ही पात्रे घेऊन एक काल्पनिक कथा तयार कर.
३) फाटलेलं पुस्तक तुझ्याशी बोलतंय अशी कल्पना करून सात ते आठ ओळी लिही.
४) आई घरी नाही आणि तुझ्या हातून बाजरी सांडली, तर तू काय करशील ?
५) आई घरी नाही आणि दूध उतू गेलं; तर तू काय करशील?
६) मित्राने छोटी चोरी केली आहे, तुला माहीत आहे. तर तू काय करशील?
७) गावातल्या संध्याकाळचे वर्णन तुझ्याशब्दांत लिही.
८) पऊस कमी झाल्याने उगवलेली रोपे सुकून गेली. हे समजल्यावर तुला काय वाटले? पाच ते सात वाक्यांत लिही.
📲जाहिरात🏆
तुमच्या वर्गाने केलेल्या कागदी फुलांची जाहिरात तयार कर.
💐पत्रलेखन🪭
१) तुझ्या बाईना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्यांचं अभिनंदन करणारं पत्र लिही.
२) तू वाचलेलं पुस्तक तुला खूप आवडलं हे सांगणारं पत्र त्या पुस्तकाच्या लेखकाला लिही.
३) अचानक आजारी पडल्याने तुला शाळेत जाता येणार नाही. मित्राच्या हाती शिक्षकांच्या नावे शाळेत येऊ शकत नसल्याचे पत्र लिहून पाठवायचे आहे असे पत्र तयार कर.
📲प्रसंगवर्णन📲
तुझ्या घरी होळी शिमगा सण कसा साजरा करतात ते लिही.
🏆विषयाशी जोडलेले शब्द🏆
१) खालील विषयाचे वर्णन करणारे पाच शब्द लिही.
उदा. आमावस्येची रात्र काळीकुट्ट, भीतीदायक, चांदण्या, गडद, शांत
अ. पावसातला चिखल
आ. घरातला पसारा
२) एकेका शब्दाने वाक्य वाढवून लिही.
अशी तीन वाक्ये बनव.
उदा. घरी जा लवकर घरी जा तू लवकर घरी जा.
अ. आई आली.
२) एकेका शब्दाने वाक्य वाढवून लिही.
अशी तीन वाक्ये बनव.
उदा. घरी जा लवकर घरी जा तू लवकर घरी जा.
अ. आई आली.
आ. तो पडला.
इ. आवाज आला.
🏆वैचारिक लेखन🏆
तुझ्या वर्गात कोणाकोणाचे फोटो आहेत? ते वर्गात का लावलेले आहेत? तुला काय वाटतं लिही.
💐शब्दांवरून गोष्ट💐
रंग- भांडण-ब्रश-मैत्री या शब्दांचा वापर करून तुला आवडेल अशी गोष्ट तयार कर.
🏆संवाद लेखन🏆
१) शाळा तुझ्याशी बोलते आहे अशी कल्पना करून संवाद लिही.
२) सुई आणि दोरा या दोन वस्तू एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद लिही.
३) पोळपाट आणि लाटणे या दोन वस्तू एकमेकांशी बोलत आहेत अशी कल्पना कन त्यांच्यातील संवाद लिही.
👬व्यक्तिचित्रलेखनाची पूर्वतयारी👬
१) तुझ्या आवडत्या मित्राचं/मैत्रिणीचं नाव लिही. तो ती तुला का आवडतो आवडते ते थोडक्यात लिही.
२) तुझ्यातील कोणतेही पाच चांगले गुण लिही. तुझ्यातील तू वाटणारे कोणतेही पाच दोष लिही.
माहितीपर लेख
मुलांना आवडणारे एक गुरुजी होते त्यांचे नाव रवींद्रनाथ टागोर. भारताच्या पूर्वेला कलकत्ता नावाचे एक शहर आहे. त्याच्याजवळ बोलपूर नावाच्या छोट्याशा गावी त्यांनी अनोखी शाळा सुरू केली. तिचे नाव शांतिनिकेतन. तिथे मुले आणि गुरुजी वर्गात बसत नसत. मोकळ्या आकाशाखाली, झाडाखाली वर्ग भरत. रवींद्रनाथ मुलांसाठी बंगाली भाषेत नाटके लिहीत. गाणी लिहीत. 'ढगाच्या मांडीवर ऊन हसतंय', 'आम्ही सगळेच राजे', 'वनावनात फाल्गुन आला', 'शेतात ऊनसावलीचा खेळ सुरू आहे' अशी कितीतरी गाणी त्यांनी लिहिली. अगदी छोट्या मुलांसाठी त्यांनी 'सहजपाठ' लिहिले. ते मुलांना फार आवडत, यात काय नवल!
प्रश्न :-
१) मुलांच्या आवडत्या गुरुजींचे नाव काय होते?
उत्तर📲
२) शाळेला अनोखी का म्हटले आहे, असे तुला वाटते?
उत्तर📲
३) मुलांना ते का आवडत असतील?
उत्तर📲
४) शिक्षकांच्या मदतीने भारताच्या नकाशात कलकत्ता शहर कुठे आहे ते बघ.
उत्तर📲
५) तुमचा वर्ग कधीतरी झाडाखाली भरवण्याबद्दल गुरुजींना चिठ्ठी लिही
उत्तर📲
गणिती भाषा
संदर्भ :- किशोरः खंड ९
लेखक: पा. पी. घरत
एक किलो वजनाचा एक मोठा बेडूक चोवीस तासांत एक किलो अन्न खातो. या भोजनात ४५ टक्के जीवजंतूंचा समावेश असतो. त्यापैकी बहुतांश किडे पिकावरील किडे असतात. बारीक जंतू पंधरा टक्के असतात. बेडूक अन्न खाताना उंदरांनाही खाऊन टाकतात. एवढेच नव्हे तर विंचूही खाऊन टाकतात पंचेचाळीस टक्के किडे म्हणजे जवळ जवळ चारशे ग्रॅम वजनाचे किडे झाले. त्याची संख्या पाहिली तर जवळ जवळ २५०० एवढी भरेल. अशा रीतीने एक बेडूक पिकाचे नुकसान करणाऱ्या २५०० किड्यांना रोज खाऊन टाकतो. पिकाचे रक्षण करतो.
बेडूक जलचर आणि स्थलचर असतात. एवढेच नव्हे तर काही बेडूक झाडावरही चढतात. ते आपल्या जीवनातील पाऊण भाग झोपेत व आरामात काढतात. तो आळशांचा राजा आहे. परंतु हा आळशी जीव माणसाचा फार उपयोगी आहे. शेतकऱ्यासाठी तर तो विश्वासू मित्र आहे. शेतात जेवढे पिकाचे दुश्मन आहेत त्या सर्वांचा बेडूक हा दुश्मन आहे. त्या कीटकांना स्वाहा करून माणसांवर तो केवढे उपकार करतो...!
प्रश्न -
१) मोठा बेडूक चोवीस तासांत किती अन्न खातो?
२) बेडकाच्या जेवणात किती टक्के जीवजंतू असतात?
३) बेडूक कोठे कोठे राहतो? हे उताऱ्यातील कोणत्या वाक्यावरून समजते?
४) बेडकाला आळशांचा राजा का म्हटले आहे?
५) बेडूक कोणाचा दुश्मन आहे?
६) या उताऱ्यास योग्य शीर्षक दे.
प्रतिसाद
टँकरचालकांना शिस्त लावावी
यंदा पाऊस कमी पडल्यामुळे उस्मानाबादेत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी पुरविले जात आहे मुख्य अहिल्याबाई होळकर पथावर पाणी भरण्याची सोय आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूककोंडी होत होती म्हणून दिशा बदलून पुढच्या बाजूने टँकर वळविण्यात आले; परंतु पाणी भरून पुन्हा भगतसिंग चौकात यु वळण घेण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर हे टँकर जातात त्यावेळी टँकरची झाकणे नीट न लावल्यामुळे पाणी सांडत जाते. त्यामुळे दुचाकी घसरतात त्यामुळे भगतसिंग चौकात सांडलेल्या पाण्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टँकर चालकांना शिस्त लावावी.
गजानन वाघमोडे
उस्मानाबाद
प्रश्न :-
१) उस्मानाबादमध्ये पाणीटंचाई का निर्माण झाली?
२) टँकरची दिशा का बदलण्यात आली?
३) टँकरचालकांना कोणती शिस्त लावणे गरजेचे आहे?
४) अपघात टाळण्यासाठी काय करावे?
६) वरील प्रतिसाद कोणी दिला आहे?

